महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ११ डिसेंबर – मनमानी पद्धतीने मोदी सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द केलेच पाहिजेत यावर शेतकरी ठाम आहेत. आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, तर आता रेल्वेरूळावर बसू, रेल्वे रोको आंदोलन करू, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
गेल्या दोन आठवडय़ांपासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. मोदी सरकारबरोबर चर्चेच्या अनेक फेऱया झाल्या; पण तोडगा निघालेला नाही. हिंदुस्थान बंद अभुतपूर्व आणि शांततेत यशस्वी झाला तरी सरकार बळीराजाच्या प्रश्नावर निर्णय घेत नाही. यामुळे शेतकरी संतप्त आहेत. आज सिंधू बॉर्डर येथे शेतकरी नेत्यांची बैठक झाली. यानंतर पत्रकार परिषदेत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
आंदोलन आणखी तीव्र करणार
जयपूर-दिल्ली, दिल्ली-आग्रा महामार्ग रोखण्यात येतील. 14 डिसेंबरला दिल्लीकडे येणाऱया सर्व महामार्गावर चक्काजाम केला जाणार आहे.