देशाला दोन वर्षात टोलनाकामुक्त करणार : नितीन गडकरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ डिसेंबर -भारत सरकार रशियाच्या मदतीने लवकरच देशात वाहनांसाठी GPS सिस्टीम आणणार आहे. त्यामुळे येत्या 2 वर्षात वाहनांचा टोल केवळ बँक लिंक्ड खात्यातूनच वसुल केला जाईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

एसोचॅम फाउंडेशन वीक कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, देशभरातील वाहनांसाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. येत्या 2 वर्षात भारताला टोलनाकामुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी भारत रशियाच्या मदतीने वाहनांसाठी GPS सिस्टीम आणत आहे. सर्व जुन्या वाहनांमध्ये GPS सिस्टम टेक्नोलॉजी लावण्यासाठी काम सुरू आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर वाहनधारकांच्या बँक लिंक्ड खात्यातूनच टोल वसूल केला जाईल.

वाहनांमधील GPS प्रणालीमुळे देश टोलनाकामुक्त होईल. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) टोलमधील उत्पन्न पाच वर्षात 1.34 ट्रिलियनपर्यंत वाढू शकते, असेही गडकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *