बेजबाबदार वाहन चालकांना ‘ब्रेक’ लावण्यासाठी दंडाची रक्कम वाढवण्याचे स्पष्ट संकेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २० जानेवारी – मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी आणि रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं एक मोठं पाऊल उचललं आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह अर्थात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांना 10 हजार रुपये आणि विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. खुद्द परिवहन मंत्री अनिल परब यांनी दंडाची रक्कम वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.इतकंच नव्हे, तर रिक्षा आणि टॅक्सीसाठी नवं परमिट देणंही थांबवण्यात येणार असून, रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

राज्य सरकानं केंद्रीय मोटर वाहन दुरुस्ती कायदा (2019) हा जवळपास एका वर्षासाठी रोखून धरला होता. ज्या धर्तीवर नवा दंड कायदाही लागू करण्यात आला नव्हता. पण, आता तो लागू करण्याचे संकेत आणि त्याबाबतचा इशाराही राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळं मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणं, विनापरवाना वाहन चालवणं, वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगानं वाहन चालवणाऱ्यांना मोठा दंड बसणार आहे. यासाठी राज्य सरकार वाहतूक विभाग आता अधिकत कठोर होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *