महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.९ ।चेन्नई । इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाला (India vs England) विजयासाठी ब्रिस्बेनसारखी ऐतिहासिक कामगिरी करावी लागणार आहे. या टेस्टच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाला 90 ओव्हरमध्ये 381 रनची गरज आहे. शुभमन गिल (Shubhaman Gill) 15 रनवर नाबाद आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 12 रनवर नाबाद खेळत आहे. पहिल्या इनिंगमध्ये अपयशी ठरलेला रोहित शर्मा दुसऱ्या इनिंगमध्येही स्वस्तात माघारी गेला. चौथ्या दिवसाअखेर भारताचा स्कोअर 39-1 एवढा आहे.
टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडने कर्णधार जो रूटच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर 578 रनचा डोंगर उभारला. यानंतर भारताला 337 रनच करता आले. 200 पेक्षा जास्त रनची आघाडी मिळवूनही इंग्लंडने भारताला फॉलो-ऑन दिला नाही. तिसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा 178 रनवर ऑल आऊट झाला. ऑफ स्पिनर अश्विनने 6 विकेट घेतल्या, तर नदीमला दोन आणि ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराहला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) दृष्टीने भारत-इंग्लंड यांच्यातली ही चार टेस्ट मॅचची सीरिज महत्त्वाची आहे. न्यूझीलंडची टीमने आधीच फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आता दुसऱ्या स्थानासाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा आहे.