व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्याना या महत्वाच्या सूचना दिल्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. ६ एप्रिल – सोमवारी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कोरोना परिस्थितीविषयी चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याविषयी माहिती दिली.

# बाहेरुन येणाऱ्यांची चाचणी आवश्यक होती- महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण जास्त का? याविषयी राज ठाकरे म्हणाले की, ‘मी मागणी         केली होती की, जे  लॉकडाऊनमध्ये बाहेरच्या राज्यात गेले आहेत ते परतले की त्यांची मोजणी करा आणि चाचणी देखील करा की           यांना कोरोना नाही ना. ही चाचणी तर नाही झाली आणि त्यांची मोजणी देखील झाली नाही’

# शाळांसंदर्भात राज ठाकरे यांनी मोठी सूचना केली आहे. शाळा आता बंद आहेत पण शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या फीज तशाच          आहेत. शाळांनी फी घेऊ नका किंवा अर्धी घ्या. एकतर मुलांचं वर्ष वाया गेलं आहे. दहावी-बारावीच्या पोरांना प्रमोट केले पाहिजे.            त्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढे ढकलले पाहिजे. कारण ते कोणत्या मानसिकतेमध्ये असतील याची कल्पना नाही आहे. आपल्याही आयुष्यात असं पहिल्यांदा घडत आहे. ही मुलं तर लहान आहेत, ते कुठून अभ्यास करतील? त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रमोट केलं तर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केलं जावं. शिवाय शाळांकडे पैसे नाही आहेत. विद्यार्थ्यांचा विचार करण्याबरोबरच सरकारने शाळांचा विचारही करायला हवा.

# वीजबीलविषयी- या सरसकट लॉकडाऊन काळात वीजबील माफ करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

# व्यावसायिकांनी जीएसटीमध्ये 50 टक्के सवलत राज्य सरकारकडून देण्यात यावी. याबाबतीत केंद्राकडे बोलून घ्यावं

# उत्पादनाबाबत- जे छोटे व्यापारी आहेत त्यांना उत्पादन सुरू ठेवण्यास सांगितलं आहे पण विक्री न करण्यास करण्यास सांगितलं आहे. असं केलं तर तेउत्पादन ठेवायचं कुठं असा प्रश्न आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना दोन दिवस विक्री सुरू ठेवण्याची सूचना राज ठाकरे यांनी दिली आहे. तसंच छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून 2-3 दिवस दुकानं सुरू करण्यास परवानगी द्या.

# बँकांविषयी- या सगळ्या दिवसात व्यवसाय बंद आहेत. अनेकांनी कर्ज घेतली आहेत. पण लोकांकडे पैसे असतील तर ते पैसे बँकांकडे परत जातील. राज्यसरकारने सर्व बँकांशी बोलून घ्यावं. कारण अनेक ठिकाणी त्याची सक्तीने वसुली केली जात आहे. 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, अशावेळी हप्ते कसे भरावे? त्याबाबत बँकांना सूचना द्यावी

# कंत्राटी कामगारांविषयी- या कामगारांना परत घेतलं होतं आणि त्यांना पुन्हा काढून टाकलं. अशाप्रकारे तहान लागली की विहिर खोदणं बरोबर नाही. दरम्यान या सर्व सूचना योग्य असून त्याविषयी मंत्रिमंडळाशी बोलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना सांगितल्याचं ते म्हणाले.

# मनोरंजन क्षेत्र, सलून, जिम इ. ना त्यांची दुकान आठवड्यातून 2-3 दिवस सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना दिली.

# क्रिडा श्रेत्र- सध्या स्विमिंग पूल बंद आहेत. पण सराव करणाऱ्या खेळाडूंसाठी काही सवलत द्यावी. स्विमिंग पूल किंवा जिम याठिकाणी गर्दी होणार नाही पण सराव करता येईल अशी सवलत द्यावी.

# राज ठाकरे पुढे म्हणाले की, सरकारी तिजोरीची परिस्थिती या अर्थसंकल्पावेळी सर्वांना समजली आहे. तरी देखील शेतकऱ्यांना एक हमीभाव द्यावा. शेतकरी कोसळला तर मोठं संकट राज्यासमोर येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *