महाराष्ट्र २४- इतिहास हेच सांगतो की सरकार बदललं की जुन्या सरकारशी संबंधित निर्णय आणि प्रकरणं चर्चेत येतात, आणि मग चौकशांची भाषा सुरू होते. महाराष्ट्रात नुकतंच सत्तांतर झालं आहे. तोच इतिहासाची पुनरावृत्ती न होती तरच नवलच.
भीमा कोरेगाव तपासाची चौकशी आणि नेत्यांच्या फोन टॅपिंगच्या चौकशीवरून राजकीय रान तर पेटले आहेच, पण त्यासोबतच इतरही अनेक चौकशा आणि मागण्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उतरल्या आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा चौकशांचं राजकारण सुरू झालं आहे