इंग्लंड दौऱ्यात खराब फॉर्म मुळे हार्दिकला डच्चू,

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १५ मे । वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship Final) अंतिम सामन्यासाठी तसंच इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. या जाहीर केलेल्या संघात अष्टपैलू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) संघात स्थान देण्यात आलेलं नाही. हार्दिकला डच्चू दिल्यानंतर त्याच्यावर अनेक दिग्गजांनी आपापलं मत मांडलं. निवड समितीचे माजी सदस्य सरनदीप सिंग यांनी हार्दिकला डच्चू देण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. खेळाडू जर ऑलराऊंडर म्हणून संघात खेळत असेल आणि तो बोलिंग टाकत नसेल, तर त्याला केवळ बॅटिंगच्या आधारावर संघात कशी जागा द्यायची?, असा सावल करत त्यांनी हार्दिकला वगळण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. (Sarandeep Singh On Hardik Pandya not selected in WTC final India vs England)

हार्दिकच्या पाठीवर 2019 साली शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याच्यानंतर त्याने नियमितपणे गोलंदाजी केलेली नाहीय. म्हणजेच त्याच्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सचा भारतीय संघाला फायदा झालेला नाहीय. जर तो बोलिंग टाकू शकत नसेल तर भारतीय संघातील अंतिम 11 खेळाडूंमध्ये तो जागा कशी बनविणार? असा सवाल सरनदीप सिंग यांनी केला.

जर हार्दिकने बोलिंग टाकली नाही तर संघाच्या संतुलनावर त्याचा परिणाम पडतो. त्याच्यामुळे संघात आणखी एक बोलर्स खेळवावा लागतो. जर अतिरिक्त एल बोलर्स खेळला तर सूर्यकुमार यादवसारखा चांगल्या बॅट्समनला संघाबाहेर बसावं लागतं. आपण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेदरम्यान याचा परिणाम भोगलाय. आपण 5 बोलर्स घेऊन खेलू शकत नाही. शेवटी कुणीतरी एक ऑलराऊंडर खेळवावा लागेल आणि भारतीय संघ त्याच दिशेने पावलं टाकतोय, असंही सरनदीप सिंग म्हणाले.

हार्दिक पांड्याला संघातून वगळल्यानंतर अनेक क्रिकेट चाहत्यांना त्याला का डच्चू दिली असावा? असा प्रश्न सतावत होता. मात्र हार्दिकची फिटनेस समस्या आणि त्याचा खराब फॉर्म या दोन गोष्टींचा बीसीसीआयने अगदी गांभीर्यपूर्वक विचार केला आणि त्याचा भारतीय संघात समावेश होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *