महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ मे । भारतात कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा विचार सुरू असून याबाबत केलेल्या पाहणीत भारतात फक्त 2 टक्के शेतकरी कृषीसंबंधी सुचनांबाबतचे ऍप वापरतात, असे दिसून आले आहे. सदरच्या ऍपवरून शेतकऱयांना हवामानाबाबत इशारा वा अन्य माहिती दिली जाते. इंटरनेट ऑफ थिंग्ज सारख्या (आयओटी)तंत्राचा वापर सध्याला प्रायोगिक तत्वावर होत आहे. आयओटीसारख्या तंत्रापासून फायदा मिळवण्यासाठी गुंतवणुकीतून परतावा योग्य तो मिळत नसल्याची तक्रार आहे.