महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । गेल्या आठवड्यात कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपल्यानंतर (Heavy Rainfall) आता संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकणात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज राज्यात एकूण नऊ जिल्ह्यांना हवामान खात्यानं (IMD) येलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. संबंधित जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
आज पुण्यासह ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि नंदुरबार या नऊ जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात आज कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. याठिकाणी पावसाची शक्यता खूप कमी आहे. आजपासून पुढील पाच दिवस राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे.
Nowcast Warning issued at 1300 Hrs IST dated 28.07.2021:
Moderate to intense spells of rain very likely to occur at isolated places in the districts of Nasik, Ghat areas of Pune during next 3 hours.
-IMD MUMBAI
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 28, 2021
पुढील तासाभरात पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, पालघर आणि घाट परिसरात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासूनचं या जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. सायंकाळनंतर याठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. दुसरीकडे मुंबईत आज अंशतः ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पण मुंबईत आज पावसाची शक्यता कमी आहे.