महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्यात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन जारी केला आहे. केंद्र सरकार लवकरच एक टीम राज्यात पाठवणार असून परिस्थितीचा आढावा घेणार आहे.
केरळमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे, म्हणून राज्य सरकराने 31 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Complete lockdown to be imposed in #Kerala on 31st July and 1st August due to rising COVID19 cases in the state pic.twitter.com/I31OvXGSoJ
— ANI (@ANI) July 29, 2021
तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया म्ह्णाले की, केंद्र सरकारची सहा जणांची एक टीम केरळमध्ये पाठवण्यात येईल. केरळमध्ये कोरोना वाढत असून केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी सहाय्य करेल.
गेल्या 24 तासात केरळमध्ये कोरोनाचे 22 हजार 56 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 33 लाख 27 हजार 301 वर गेली आहे. तर गेल्या 24 तासात 131 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 16 हजार 457 वर पोहोचली आहे.
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 17 हजार 761 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 31 लाख 60 हजार 804 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 1 लाख 49 हजार 534 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.