महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । नागपूर – ‘विवाहित महिलेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ असं लिहिलेलं किंवा प्रेम व्यक्त करणारी कविता, शायरी लिहिलेला कागद फेकणे’ हा विनयभंगच असल्याचा महत्त्वपूर्व निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर Nagpur खंडपीठाने दिला आहे. अकोला Akola जिल्ह्यातील एका विनयभंगाच्या घटनेबाबद निर्णय देताना न्यायालयाने Court हे मत व्यक्त केलं आहे.
२०११ साली अकोला जिल्हयात मध्ये घडलेल्या घटनेत, एका ४५ वर्षीय महिलेने एका ५४ वर्षीय पुरुषावर विनयभंग करून तिला धमक्या देण्याचा आरोप केला होता. पीडित महिला ही विवाहित असून तिला एक मुलगा देखील आहे.
आरोपीने या पीडित महिलेला एक प्रेमपत्र दिलं होतं आणि त्या महिलेने प्रेमपत्र घेण्यास नकार दिल्यावर, त्याने ही चिठ्ठी तिच्या अंगावर फेकली आणि ‘आय लव्ह यू’ म्हणाला होता. या प्रकरणी एखाद्या ४५ वर्षीय विवाहितेच्या अंगावर प्रेम व्यक्त करणारी कविता लिहिलेली चिठ्ठी फेकणे हा विनयभंगच आहे,’ असं न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.