Maharashtra ; हॉटेलचालकांना मोठा दिलासा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । राज्य सरकारने राज्यातील हॉटेलचालकांसह विविध घटकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकराने राज्यातील हॉटेल्स चालकांना वेळ वाढवून दिली आहे. यासह मॉल्स आणि हॉल्सही 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तसेच जीम्सही सुरु करण्यात येणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची घोषणा केली. सह्याद्री अतिथीगृहामध्ये ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. या निर्णयाची अंमलबजावणी ही 15 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर जीम्स, मॉल्स बंद ठेवण्यात आल्या होत्या. (Hotels will be open till 10 pm, malls and halls will be opened at 50 per cent capacity decision in maharashtra state cabinet meeting)

या आधी सरकारने हॉटेलचालकांना 50 टक्के क्षमतेने दुपारी 3 वाजेपर्यंत हॉटेल्स सुरु ठेवण्याची परवानगी दिली होती. तर त्यानंतर केवळ पार्सल सेवेसाठीच मुभा देण्यात आली होती. दरम्यान आता हॉटेलचालकांना रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल्स सुरु ठेवता येणार आहे. सरकारने निर्बंधातून सूट दिल्याने हॉटेलचालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले असावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *