महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । शाळा सुरू न झाल्याने बालभारतीने छापलेली लाखो शालेय पुस्तके पडून ,आता ही पुस्तके रद्दीत देण्यासाठी बालभारतीने काढले टेंडर, ४२६ मेट्रीक टन पुस्तके रद्दीत विक्रीसाठी काढले टेंडर, पेपर मिल्सकडून टेंडर मागवण्यात आले.
बालभारतीच्या नऊ गोदामांमध्ये पुस्तके पडून ,पुणे, गोरेगाव, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि पनवेल इथल्या गोदामात ही पुस्तके पडून , मार्च २०२० पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद , मात्र शाळा बंद असूनही बालभारतीने छापली लाखो शालेय पुस्तके , शाळा बंद असूनही बालभारतीने पुस्तके का छापली ? पुस्तके छापली, मात्र शाळा सुरू नसल्याने ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यातच आली नाहीत त्यामुळे ही सर्व पुस्तके बालभारतीच्या विविध गोदामांमध्ये पडून आहेत .