महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा चर्चेचा विषय ठरत आहे. राणे आपल्या वक्तव्यांनी माध्यमांच्या केंद्रस्थानी आहेत. भाजपबरोबर सत्ताधारी महाविकास आघाडी देखील राणेंच्या यात्रेवर लक्ष ठेवून आहे. याचदरम्यान नारायण राणे यांना आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फोन केला. राजनाथ सिंह यांनी फोन करुन राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली.