महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 3 सप्टेंबर । दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा विचार असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. शाळा सुरु करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. त्यानुसार दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचं काही लोक म्हणतात, तर दुसरा मतप्रवाह आहे तो म्हणजे शून्य टक्के रुग्ण आहे, तिथे शाळा सुरु करा. याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील, असंही अजित पवारांनी सांगतिलं.