महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ सप्टेंबर । मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : संतपीठ हे प्रेक्षणीय स्थळ राहता कामा नये, निजामकालीन दीडशे शाळांचा विकास करू. निजामांच्या कोणत्याही खुणा राहणार नाहीत याची काळजी घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.ते औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
ज्याप्रमाणे मराठवाडा निजामांशी लढला तसे आपण कोविडशी लढू. निजामशाहीच्या कोणत्याही खुणा आपल्याला ठेवायच्या नाहीत.औरंगाबादमध्ये अनेक विकासकामे झाली, ती विरोधकांना दिसत नाही. औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरू करण्याचा संकल्प आहे. अहमदनगर आणि औरंगाबाद रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी आम्ही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विनंती करणार आहे, असेही ते म्हणाले.