Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
सर्वसामान्यांना दिलासा; सणासुदीत काळात खाद्यतेलाचे भाव स्थिर - Maharashtra 24

सर्वसामान्यांना दिलासा; सणासुदीत काळात खाद्यतेलाचे भाव स्थिर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑक्टोबर । खाद्यतेलावरील आयात शुल्क दोन वेळा कमी केल्यानंतर, अद्यापही तेलाचे दर मुंबईत कमी झालेले नाहीत. सणांमुळे मागणी वाढल्याने ऐन सणासुदीत दर स्थिर झाले आहेत.सध्या सर्वत्र सणासुदीचे वातावरण आहे. नवरात्र व त्यानंतर दिवाळी यामुळे बाजारात मागणी वाढलेली आहे. परिणामी, किरकोळ व्यापाऱ्यांनी पुढील मागणी पाहून आत्ताच खाद्यतेलाची खरेदी केली आहे. त्यातूनच आयात शुल्क रद्द केल्यावर अद्यापही दर कमी झालेले नाहीत.

भारत हा खाद्यतेलाची सर्वाधिक मागणी असलेला देश आहे. भारतात एकूण मागणीच्या जवळपास ७५ टक्के तेल हे शुद्ध, तेलबिया किंवा कच्च्या तेलाच्या रूपात आयात केले जाते. त्यामध्ये पामतेल ५५ टक्के, सोयाबीन १५ टक्के व सूर्यफुल तेलाची पाच टक्के आयात होते. केंद्र सरकारने मागील दोन महिन्यांत दुसऱ्यांदा आयात शुल्कात कपातीचा निर्णय घेतला आहे. पण त्यानंतरही दर फारसे कमी झालेले नाहीत. मागणी मोठी असल्याचा हा परिणाम आहे.

सध्या मुंबईसारख्या शहरांत हॉटेल्स, रेस्तरां व स्टॉल्स मोठ्या प्रमाणात असल्याने पामतेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचवेळी आधी गणेशोत्सव व त्यानंतर आता नवरात्रोत्सव या सणांच्या कालावधीत सोयाबीन व सूर्यफूल तेलाची मागणीही वाढती आहे. करोना व अन्य संकटांमुळे खाद्यतेल आयातीचे गणित बिघडलेले असताना, वाढत्या मागणीमुळे दर स्थिर झाले आहेत. दिवाळीपर्यंत तरी यांत फार घट होण्याची चिन्हे कमीच असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत मुंबईत खाद्यतेलाचा सरासरी दर १२५ ते १३५ रुपये प्रति लिटर होता. त्यानंतर करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आयातीत घसरण झाली. परिणामी मे-जूनदरम्यान सरासरी दर १७०ते १८० रुपये प्रति लिटरच्या घरांत गेला. याआधीच्या आयात शुल्क कपातीमुळे सरासरी दर १५० ते १६० रुपयांवर आले आहेत. आता सध्या खाद्यतेल दर १४० ते १६० रुपये प्रति लिटरवरच स्थिरावले आहेत.

तेल साठ्यासंबंधी राज्य सरकारांनी निर्णय घेण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. परंतु यामुळे राज्य सरकार स्तरावर ‘इन्स्पेक्टर राज’ वाढेल. यातून पुन्हा खाद्यतेलाचे दर वधारतील. त्यामुळे साठा मर्यादेचा निर्णय मागे घेतला जावा, अशी मागणी अखिल भारतीय खाद्यतेल महासंघाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *