हॉटेल रेस्टॉरंट खाणे महागणार ; दरात होणार किमान २० टक्क्यांची वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ नोव्हेबर । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच स्तरातील लोकांना फटका बसला. याचा फटका हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकांनाही बसला. राज्यात गेल्या दीड वर्षात अनेक महिने बुहतांश ठिकाणी हॉटेल-रेस्टॉरंट सेवा ही बंद राहीली, जी सुरु होती, ती रडतखडत सुरु होती. वीजबील, जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार यामुळे या हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकांचे पार कंबरडे मोडले होते. त्यातच वाढत्या महागाईमुळे या व्यवसायाशी संबंधित सर्वच गोष्टींचे दर हे वाढल्यामुळे आता यापुढे हॉटेल- रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांचे दर वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे हॉटेल- रेस्टॉरंटशी संबंधित ‘आहार’संघटनेने स्पष्ट केले आहे.

हॉटेल- रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांच्या दरात दरवर्षी साधारण जून महिन्यामध्ये वाढ होते. गेली दोन वर्ष ही वाढ झालीच नाही. तर दुसरीकरीकडे सर्वसमान्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. तेव्हा दरवाढ करताना याचाही विचार केला जाईल, असे मत ‘आहार’चे उपाध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

अनेक हॉटेल- रेस्टॉरंट यांनी याआधीच दरवाढ केलेली आहे, तर काही करत आहेत. कोरोनामुळे हॉटेल- रेस्टॉरंट व्यवसाय हा पाच वर्षे मागे गेलेला आहे. दोन वर्षातील परिस्थिती आणि त्यात महागाई यामुळे खाद्य पदार्थांच्या दरात किमान २० टक्के एवढी दरवाढ ही अपेक्षित आहे. ही दरवाढ करताना सर्वसामान्य ग्राहकांचाही विचार केला जात असल्याचे ‘आहार’चे सरचिटणीस सुकेश शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. जर तुम्ही हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि खाद्यपदार्थांचे दर वाढलेले असतील तर मुळीच आश्चर्य वाटायला नको. अनेक ठिकाणी ही दरवाढ झालेली आहे आणि यापुढील काही दिवसांत सर्वच ठिकाणी होणार आहे, हे हॉटेल- रेस्टॉरंटशी संबंधित संघटनेने दिलेल्या प्रतिक्रियांवरुन स्पष्ट होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *