नवी दिल्ली : वृत्तसंस्था –
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने नागरिकांना बँकांमधील रक्कमेबाबत आश्वस्त केले आहे. आणि सांगितले आहे की बँकेतील सर्व खातेदारांच्या रक्कमा सुरक्षित आहेत. आरबीआयने एक ट्विट केले की आरबीआयची नजर सर्व बॅंकावर असते आणि लोकांची बँकेतील जमा राशी धोक्यात नाही.पहिल्यांदा पीएमसी बँक आणि त्यानंतर आता येस बँक यांच्यावर आरबीआयने बंधन आणली त्यामुळे लोक बँकेतील आपल्या रक्कमेबद्दल चिंतेत आहेत. आरबीआयने यामुळे लोकांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला. यात आरबीआयने एक ट्विट केले ज्यात मीडियातून बँकांमधील जमा रक्कमेच्या सुरक्षेबाबत व्यक्त करण्यात येणारी चिंतेवर आधारित आहे.
आरबीआयने ट्विट केले की, विविध बँकांमध्ये जमा असलेल्या रक्कमेच्या सुरक्षेवर मीडियातील काही वर्गांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. ही चिंता विश्लेषणावर आधारित आहे, जी त्रुटीपूर्ण आहे. बॅंकांची सॉल्वेंसी आंतरराष्ट्रीय स्तरावर कॅपिटल टू रिस्क वेटेड असेस्ट्स यावर आधारित असते ना की भांडवली बाजारावर. आरबीआयने नुकतेच येस बँकेवर एक महिन्यांची रोख आणली होती. यानंतर शुक्रवारी केंद्रीय बँकेने येस बँकेचे पुनर्गठनाची योजना सादर केली. तसेच, एसबीआयच्या बोर्डने येस बँकेत 49 टक्के भागीदारी खरेदी संबंधित सिद्धांताला मंजुरी दिली आहे.