पुजाराकडून मोठी चूक घडली आणि भारताच्या हातून सामना निसटला, पाहा नेमकं काय घडलं…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ जानेवारी । केप टाऊन कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ विकेट्स च्या प्रतिक्षेत होता आणि यावेळी चेतेश्वर पुजाराकडून मैदानात मोठी चूक घडली आणि त्याचा चांगलाच फटका भारतीय संघाला बसल्याचे पाहायला मिळाले.

ही गोष्ट घडली ती ४०व्या षटकात. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हे षटक टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा अर्धशतकवीर कीगान पीटरसन पुढे सरसावला होता. पण बुमराने यावेळी असा अचूक चेंडू टाकला होता की, त्याचा सामना पीटरसनला करत आला नाही. पीटरसनच्या बॅटची कडा यावेळी चेंडूला लागली आणि पुजाराकडे एक सोपा झेल जात असल्याचे सर्वांनीच पाहिले. पुजारा ही कॅच पकडण्यााठी सरसावला खरा, पण त्याला हा झेल पकडता आला नाही. त्यावेळी पीटरसन हा ५९ धावांवर खेळत होता आणि भारताला विकेट्स मिळवण्याची नितांत गरज होती. पण पुजाराला यावेळी हा झेल पकडता आला नाही. त्यानंतर पीटरसनने ८२ धावांची खेळी साकारल्याचे पाहायला मिळाले. जर पुजाराने हा झेल पकडला असता तर भारताला दक्षिण आफ्रिकेवर जास्त दडपण टाकता आले असते. त्यामुळे पुजाराची ही चूक भारतासाठी चांगलीच महागात पडली आणि पराभवाची एक कारणही ठरली. पीटरसनने जीवदान मिळाल्यावर त्याचा चांगलाच फायदा घेतला. पण पीटरसनला यावेळी आपले शतक मात्र साजरे करता आले नाही. कारण शार्दुल ठाकूरने प्रतिम चेंडू टाकत पीटरसनला बाद केले आणि भारताला यश मिळवून दिले. पण तोपर्यंत वेळ मात्र निघून गेली होती.

पुजाराकडून झेसल सुटल्यावर भारताचा कर्णधार विराट कोहली चांगलाच वैतागलेला पाहायला मिळाला. कारण त्याला या विकेटचे मोल माहिती होते. दुसरीकडे बुमराही निराश झाला आणि त्याचा परीणाम संघावर झाल्याचेही पाहायला मिळाले. एखाद्या गोष्टीमुळे संपूर्ण संघावर कसा परीणाम होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण यावेळी क्रिकेट विश्वातील चाहत्यांना पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *