राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु आहेत. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे परीक्षा ऑनलाईन घ्याव्या की ऑफलाईन यावर मागील काही दिवसांपूर्वी संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आह. त्यांनी परीक्षा ऑफलाईनच होतील असं सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *