अक्षय कुमारसोबत वाद झाल्याच्या चर्चांवर कपिल शर्माने सोडले मौन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ फेब्रुवारी । सध्या सोशल मीडियावर कॉमेडियन कपिल शर्मा आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यातील संबंध बिघडल्याच्या सुरू आहेत. अक्षय कुमारने आपला आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’चं प्रमोशन कपिल शर्मा शोमध्ये करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्याचेही सांगितले जात आहे. कारण अक्षय कुमारने समजावल्यानंतरही कपिल शर्मा शोच्या मेकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तयार करण्यात आलेले विनोद ऑनएअर केले होते. त्यामुळे अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे. ज्यावर आता कपिल शर्माने मौन सोडले आहे.

अक्षय कुमारसोबत वाद झाल्याच्या चर्चांनंतर कपिल शर्माने एक ट्वीट केले आहे. कपिलने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, माझ्या मित्रांनो, मी सोशल मीडियावरील अक्षय कुमारच्या संदर्भातील सर्व वृत्त पाहिली आणि वाचली आहेत. अक्षय कुमारशी माझे बोलणे झालं आहे आणि सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. हे केवळ गैरसमज होते. आता सर्व ठीक झाले असून आम्ही लवकरच ‘बच्चन पांडे’चा एपिसोड शूट करणार आहोत. तो माझा मोठा भाऊ आहे. त्यामुळे तो माझ्यावर कधीच रागावू शकत नाही. धन्यवाद !

दरम्यान येत्या १८ मार्चला चित्रपटगृहात अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. तसेच अक्षय कुमार आगामी काळात ‘राम सेतू’ ‘रक्षाबंधन’ ‘पृथ्वीराज’, ‘सेल्फी’ आणि ‘सिंड्रेला’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय अलिकडच्या काळात त्याचा सारा अली खान आणि धनुष यांच्यासोबत ‘अतरंगी रे’ हा चित्रपट रिलीज झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link