कोकणात राजकारण तापणार ! किरीट सोमय्या दापोलीसाठी रवाना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ मार्च । भाजपाचे नेते किरीट सोमय्या कोल्हापूर गेले तिथेही राडा झाला. नंतर पुण्याला गेले तिथेही राडा झाला. त्यानंतर रायगडला गेले आणि तिथेही वाद निर्माण झाला आणि आता आज किरीट सोमय्या रत्नागिरीतल्या दापोली दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यातही वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोकणातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलंच तापलं आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याचदरम्यान, किरीट सोमय्या आज सकाळीच दापोली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक मोठा हातोडा प्रसारमाध्यांसमोर दाखवला. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. जनता असाच हातोडा घेऊन यांना बाहेर घालवणार आहे. साडेबारा कोटी जनतेचा हा हातोडा असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत.

मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी आज चलो दापोलीचा नारा दिला आहे. शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकरांचा बंगला तोडला आता अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडूयात असेही ते म्हणालेत. आम्ही जनतेची भाषा बोलतो. जनतेची ताकद दाखवायला मी दोपीलाला जात आहे, असं किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *