महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन : पुणे ;मुंबई: राज्यात करोनाचा संसर्ग वाढतच असून आज आणखी ४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ५३७ वर पोहोचला आहे.
नव्यानं आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील २८, ठाणे जिल्ह्यातील १५, पुण्यातील दोन, अमरावती व पिंपरी-चिंचवडमधील एकाचा समावेश आहे. देशातील अन्य राज्यांशी तुलना करता करोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यातही मुंबईचा पहिला क्रमांक आहे. मुंबईत कालपर्यंत २७८ रुग्ण होते. आज त्यात आणखी २८ जणांची भर पडली आहे. त्यामुळं हा आकडा आता ३०६ झाला आहे. राज्यात आतापर्यंत २७ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.