रेल्वेची तयारी सुरु; १५ एप्रिलपासून पुन्हा रुळावर?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ;मुंबई: नवी दिल्ली : लॉकडाऊनपासून देशातील विमान आणि रेल्वेसेवाही बंद आहे. १४ एप्रिलपर्यंत हे लॉकडाऊन राहणार आहे. १५ एप्रिलपासून प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याची तयारी केली जात असल्याची माहिती पीटीआयला सूत्रांनी दिली आहे. १५ एप्रिलपासून प्रवासी रेल्वे पुन्हा रुळावर आणण्याची तयारी सुरू झालं असल्याचं बोललं जात आहे. सध्या फक्त मालगाड्यांचीच वाहतूक रेल्वेच्या वतीने सुरू असून प्रवासी रेल्वे पूर्णपणे बंद आहे.

एअर इंडियाची बुकिंग ३० एप्रिलपर्यंत बंद
रेल्वेसोबतच विमानसेवाही सध्या बंद आहे. लॉकडाऊन पुन्हा वाढणार की संपणार याबाबत कोणतीही निश्चित माहिती नाही. त्यामुळे एअर इंडियाने ३० एप्रिलपर्यंत बुकिंग सुविधा बंद केली आहे. १४ एप्रिलनंतरच्या निर्णयाची आम्हाला प्रतिक्षा असल्याचं एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितलं. विमानवाहक कंपन्या १४ एप्रिलनंतरची बुकिंग सुरू करू शकतात, असं नुकतंच नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी म्हटलं होतं. २५ मार्च रोजी सुरू झालेलं लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *