मास्क नसेल तर मंत्रालयात कोणालाच प्रवेश मिळणार नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; मुंबई ; राज्यावरील कोरोना संकट अधिक गंभीर होत चालले आहे. देशातील सर्वांधिक कोरोनाग्रस्त राज्यात असून ही संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून, रुग्ण आढळलेले सर्व भाग सील करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयात फेस मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. यामध्ये स्टाफसह,अधिकारी तसेच भेटी देणाऱ्यांना येत्या काही महिन्यांसाठी मास्क सक्तीचा असेल. जर फेसमास्क नसेल, तर प्रवेश दिला जाणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *