निझामुद्दीनमध्ये तबलिगींच्या कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी? अनिल देशमुख

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई : देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनाच सवाल केला आहे. दिल्लीतील निझामुद्दीन येथे तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी, असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या लेटर हेडवर केंद्र सरकारला पत्र लिहून हा सवाल केला आहे. मात्र, अनिल देशमुख यांनी सवाल उपस्थित केला असला तरी त्यांनी पत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नामोल्लेख टाळला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिल्लीत निझामुद्दीन तब्लिगी कार्यक्रम परवानगी कशी दिली? महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबत परवानगी नाकारली होती. मग केंद्राने कशी काय परवानगी दिली, असा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थितीत केला आहे.
मरकज कार्यक्रम जिथं झाला, तेथील पोलिस स्टेशनने हा कार्यक्रम का थांबवला नाही? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल त्या रात्री उशीरा मरकज येथे का गेले? तिथ दिल्ली पोलिस अधिकारी का नाही गेले, असे अनेक सवाल आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थितीत केले आहेत.
दिल्ली पोलिस आयुक्त आणि अजित डोवाल अजूनही या मुद्द्यावर भाष्य का करत नाहीत, तसेच अजित डोवाल यांना भेटल्यानंतर मरकज मौलाना हे कुठे गायब झाले असा सवाल ही अनिल देशमुख यांनी उपस्थितीत केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *