महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । मुंबई : केरळात २९ मे रोजी मान्सून दाखल झाला असून त्याचा महाराष्ट्राकडील प्रवास सुरू आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रात महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती दिली आहे.
मान्सून पहिल्यांदा महाराष्ट्रातील कोकणात दाखल होतो. त्यानंतर सात ते आठ दिवसांत मुंबईत दाखल होत असतो. त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रात पावसाला सुरूवात होत असते. त्यामुळे १० जूनच्या नंतर मुंबईत मान्सून येणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती दिली दिली होती. मान्सून केरळात दाखल झाल्यावर एका आठवड्यात महाराष्ट्रातील तळकोकणात दाखल होत असतो. त्यानंतर एका आठवड्यात मुंबईत मान्सून दाखल होत असतो.
दरम्यान स्कायमेटने हवामान विभागाच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एका निरिक्षणावरून अंदाज व्यक्त करणे म्हणजे निकषांचे उल्लंघन आहे असा दावा स्कायमेटने केला होता. म्हणून केरळात मान्सून दाखल झाला नाही असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आता हवामान विभागाने दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर येणार असल्याची माहिती दिली आहे.