अशा घटनांमुळे कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत होईल, अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नवी दिल्ली : वांद्र्याच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. शहा यांनी घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येणे ही काळजीचं कारण आहे. अशा घटना होऊ नयेत याची दक्षता घ्या. अशा घटनांमुळे भारताची कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर केंद्र राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *