शिंदे गट मविआचा पाठिंबा काढणार? राज्यपालांना देणार पत्र

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ जून । एकनाथ शिंदेंसह शिवसेना आमदारांच्या बंडाचा आजचा पाचवा दिवस आहे. आता शिवसेना सावध झाली असून मित्रपक्षांच्या गाठीभेटींना उधाण आलं आहे. शरद पवार यांची राऊतांनी भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांचीही या प्रकरणात एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेना आता आमदारांविरोधात आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. या आमदारांवर कारवाई करण्याची सेनेची मागणी जोर धरु लागली आहे. १६ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली जात आहे. (Maharashtra Politics Live Updates)

राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. यासंदर्भात त्यांनी लिस्ट शेअर करत ट्वीट केलं आहे.

आज शिंदे गटाकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याची शक्यता आहे. तसं पत्र राज्यपालांना देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *