पावसाचा अंदाज ; राज्यात आज या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । सध्या पाऊस कधी पडणार असा प्रश्न प्रत्येकाला पडतोय पण तुमची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण आज राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

शनिवारी कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडल्या. रत्नागिरी येथे सर्वांत जास्त पावसाची नोंद झाली. ९५ मिलिमीटर इतका पाऊस तिथे पडला. मात्र आज राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.केरळ किनारपट्टीवर पाऊस पडल्यानंतर राज्यात पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली होती मात्र अद्याप पुरेसा आणि समाधानकारक पाऊस पडल्याने राज्यातील शेतकरी राजा चिंतेत आहे.अरबी समुद्रावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती अद्याप कायम असून झारखंड ते विदर्भादरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी विदर्भ आणि कोकणात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुणे शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. मात्र, शनिवारी शहरात पाऊस पडला नाही. शहरात सध्या सकाळी ढगाळ वातावरण, तर दुपारी ऊन, असे चित्र पाहायला मिळत आहे. ही स्थिती येत्या शुक्रवारपर्यंतअशीच राहील. परिसरात ढगाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. बुधवार आणि गुरुवारी घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

या जिल्ह्यांत यलो अलर्ट आहे

ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या या जिल्ह्यांत यलो अलर्ट आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *