श्रावणातील पौर्णिमा दोन दिवसांची असल्याने रक्षाबंधनाच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम ; तज्ज्ञांनी सांगितली योग्य वेळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ ऑगस्ट । यावर्षी पौर्णिमा दोन दिवसांची असल्याने रक्षाबंधनाच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. काही तज्ज्ञ ११ ऑगस्टला तर काही १२ ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करावा असे सांगत आहेत. तथापि, १२ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करणे खूप शुभ ठरेल, असे बहुतांश तज्ज्ञांचे मत आहे.

या वर्षी श्रावण महिन्याची पौर्णिमा ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांनी सुरू होत आहे. या वेळेत भद्राही होत असून ते रात्री ८ वाजून ५३ मिनिटांनी संपेल. शास्त्रानुसार भद्रकालमध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ मानले जाते. ११ ऑगस्ट रोजी, प्रदोष काळात, संध्याकाळी ५ वाजून १८ मिनिटे ते ६ वाजून १८ मिनिटांच्या दरम्यान राखी बांधता येईल.

यानंतर, भद्राच्या शेवटी, रात्री ८ वाजून ५४ मिनिटे ते ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत राखी बांधता येते. परंतु हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर राखी बांधण्यास मनाई आहे. याच कारणामुळे १२ ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ मानले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार राखी बांधताना भावाचे तोंड पूर्व दिशेला आणि बहिणीचे तोंड पश्चिम दिशेला असावे. सर्वप्रथम बहिणी आपल्या भावाला कुंकू आणि तांदूळ यांचा टीका लावावा. तुपाच्या दिव्याने भावाला ओवाळावे. त्यानंतर त्याला मिठाई भरवून भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी.

( माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *