या दिवशी झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ ऑगस्ट । झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. झी मराठीवर (Zee Marathi) अनेक नव्या मालिका सुरू होणार आहेत. पण मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. झी मराठी वाहिनीने नुकतीच त्यांच्या सोशल मिडियावरुन नव्या मालिकेची घोषणा केली. नव गडी नवं राज्य मालिकेचा प्रोमो ही रिलीज झाला आहे.

नवी मालिका येणार म्हटलं की तीची वेळ काय असेल, कोणत्या मालिकेच्या जागी ही मालिका येईल अर्थात कोणती मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असे एक ना अनेक प्रश्न पडतात.

https://www.instagram.com/zeemarathiofficial/?utm_source=ig_embed&ig_rid=9054211e-7d40-4ed2-bd62-15ad2ca8e887

मिळालेल्या माहितीनुसार अदिती आणि सिद्धार्थची तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्या जागी अनिता दाते, पल्लवी पाटील आणि कश्यप परुळेकर यांची नव गडी नवं राज्य ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या ६ ऑगस्टला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *