महाराष्ट्र सत्तासंघर्ष ; न्यायालयाचा दिलासा कोणाला मिळणार ? निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काल (बुधवारी) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरू झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली. आजच्या सुनावणीत मूळ पक्ष कोणता, आमदारांची अपात्रता यावर युक्तिवाद झाला. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी झाली.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील कालचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आज पुन्हा सुनावणी होणार आहे. आज सकाळी हे पहिल्या क्रमांकाचे प्रकरण असेल, असे सरन्यायाधीश रमण्णा यांनी स्पष्ट केलं होतं. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली. आजच्या सुनावणीत मूळ पक्ष कोणता, आमदारांची अपात्रता यावर युक्तिवाद झाला. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी झाली.

शिंदे गटाचा युक्तीवाद

राज्यातील सत्तासंघर्षावर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असताल त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद झाला. ठाकरे गटाच्या वकिलांकडून वारंवार बंडखोरांकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा पुढे केला. तर शिंदे गटाने वारंवार आपण अद्यापही शिवसेना पक्षातच असून सदस्यत्व सोडले नसल्याचा दावा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *