लोकसभा निवडणूक आज झाली तर काय ?:भाजपला धक्का ! महाराष्ट्रात 48 पैकी …..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । लोकसभेच्या आज निवडणुका झाल्या, तर महाराष्ट्रात भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यातल्या 48 पैकी फक्त 18 जागा भाजपला मिळतील, असा अंदाज आहे. देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, इंडिया टुडे आणि सी व्होटरने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून ‘देशाचा मूड’ जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या आश्चर्यकारक निष्कर्ष आले. या सर्व्हेत महाराष्ट्रात राजकीय स्थितीचेही मुल्यांकन करण्यात आले आहे. जर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. तर महाराष्ट्रात युपीएला 48 पैकी 30 जागा मिळतील. तर भाजपप्रणित एनडीला 18 पर्यंत जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी कायम राहिल्यास ही भाजपसाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपने 2019 मध्ये शिवसेनेसोबत एकत्र लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना तब्बल 42 जागांवर विजय मिळाला होता.

सर्व्हेनुसार, बिहारमध्ये जर निवडणुका झाल्या, तर नितीश कुमार यांनी एनडीए सोडल्याचा भाजपला फटका बसू शकतो. तर यूपीए फायद्यात असू शकते. कारण, सर्वेक्षणात 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यानच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार, 1 ऑगस्ट रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या असत्या, तर जेडयूसोबत असल्याने एनडीएला 543 जागांपैकी 307 जागा मिळाल्या असत्या. तर यूपीएला 125 जागा मिळाल्या असत्या तर इतरांना 111 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पण, आता नितीशकुमार यांनी एनडीएपासून फारकत घेतल्याने आता परिस्थिती बदलली आहे. बिहारमध्ये सरकार बदलल्यानंतर निवडणुका झाल्या असत्या, तर एनडीएला थेट 21 जागा कमी मिळाल्या असत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व पक्ष एकवटले असले तरी लोकसभा निवडणुका झाल्यास एनडीला स्पष्ट बहुमत मिळेल असे दिसतंय. मोदींना 330 जागा मिळण्याच्या शक्यता आहे. एनडीएला 2019 मध्ये 353 जागा मिळाल्या होत्या.

सी व्होटरच्या सर्वेक्षणात ईडी, सीबीआयचा गैरवापर होत आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर 38 टक्के लोकांनी होय आणि 41 टक्के नाही असे उत्तर दिले. तर 39 टक्के लोकांच्या मते देशातील जातीय वातावरण बिघडले आहे. 34 टक्के लोकांनुसार देशातील सलोखा वाढला आहे. 18 टक्के लोक हे न्युट्रल राहिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *