महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका दिला असून, पुणे आणि मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मविआ सरकारने बीएमसीसाठी 236 वॉर्ड केले होते. मात्र, सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीसांनी याची संख्या कमी करुन 227 वॉर्ड करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला शिवसेनेकडून आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका बसला आहे.
मविआ सरकारला पायउतार करून शिंदे आणि फडणवीस यांनी नव्या सरकारची स्थापना केली होती. त्यानंतर अस्तित्त्वात आलेल्या नव्या सरकारने 2017 साली असलेल्या 227 वॉर्ड प्रमाणे निवडणुका घेतल्या जाव्यात, असा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टात शिवसेनेकडून आव्हान देण्यात आले होते.