अन्नाचे दोन घास खाणंही कठीण होऊन बसलं ; टोमॅटो 500 रुपये, कांदे 400 रुपये किलो; महागाईचा भस्मासूर जगू देईना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑगस्ट । पाकिस्तानात टोमॅटो 500 रूपये, कांदे 400 रूपये, बटाटा 120 रूपये किलो इतक्या किमतीनं विकला जातोय. लाहोर, पंजाब प्रांतातल्या पूरस्थितीमुळे पाकिस्तानात भाज्यांच्या किंमती कमालीच्या कडाडल्या आहेत. त्यामुळे आता भारतातून भाजी आयात करण्याचा पाकिस्तानचा विचार आहे. दरम्यान, येत्या काळात हे दर 700 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

पाकिस्तानात आधीच महागाई थैमान घालतेय. त्यात पूरस्थितीमुळे या महागाईत दुपटीनं भर घातली आहे. बलुचिस्तान, सिंध, दक्षिण पंजाब भागातून येणाऱ्या भाज्यांची आवक घटली असल्यामुळं वाघा बॉर्डरवरून भाज्या मागवण्याचा विचार सध्या पाकिस्तान करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *