Maharashtra Rain Update | राज्यातील या विभागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाने दिला इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ सप्टेंबर । गेल्या दोन दिवसापासून राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. पुढील चारही दिवस कोकणासह राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात काल पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील चार दिवसांसाठी हवामान विभागाचे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

या जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेज अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पुणे आणि रत्नागिरीसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना १७ सप्टेंबरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर १८ ते २० सप्टेंबरला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि मराठवाड्यामधील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

आज पहाटेपासून मुंबईसह महानगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसापासून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. राज्यात गणेश उत्सव काळात पावसाने विश्रांती घेतली होती.

यावर्षीचा मान्सून एक महिना उशीरा सुरू झाला. पण तरीही मान्सून मोठ्या प्रमाणात झाला आहे. विदर्भासह, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. तर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *