Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी हा नवा नियम लक्षात घ्या, अन्यथा होईल नुकसान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ ऑक्टोबर । जर तुमच्याकडे रेशन कार्ड (ration card) असेल आणि तुम्ही सरकारच्या रेशन योजनेचा लाभ घेत असाल ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.सरकारकडून रेशन कार्डबाबत नवीन आदेश जारी करण्यात आला असून त्याअंतर्गत अंत्योदय व पात्र घरगुती रेशन कार्ड धारकांची पडताळणी 30 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

जर पडताळणी दरम्यान अपात्र आढळलेल्यास लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द करण्यात येईल. यासोबतच त्यांच्या जागी पात्र लाभार्थ्यांची ओळखपत्रे बनवून त्यांना रेशन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. (Ration Card Cancellation)

यासंदर्भात अतिरिक्त अन्न आयुक्त अनिल कुमार दुबे म्हणाले की, लाभार्थ्यांनी दिलेली वैयक्तिक माहिती वेळोवेळी बदलत राहते. या संदर्भात वेळोवेळी अपात्र घटकांचा शिधापत्रिकेत समावेश केल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. अपात्र कार्डधारकांसाठी ही मोहीम ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013’ (National Food Security Act) अंतर्गत चालवली जाते.अपात्र लाभार्थ्यांच्या जागी पात्रांना शिधापत्रिका दिली जातात.

लाभार्थ्यांच्या यादीतून अपात्रांची नावे काढून पात्रांना संधी देणे हा अशा मोहिमेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या अंतर्गत दिलेल्या माहितीच्या आधारे कुटुंबातील सदस्यांची संख्या, वय, राहण्याचे ठिकाण इत्यादी तपशील एकत्रित करून डेटाबेस तयार केला जातो. या संदर्भात कार्डधारकांचा मृत्यू किंवा आर्थिक स्थिती चांगली असल्याच्या आधारे कार्डधारक अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान सरकारकडून वेळोवेळी शिधापत्रिकांची पडताळणी केली जाते. गेल्या काही दिवसांत सरकारने संसदेत दिलेल्या माहितीत 2017 ते 2021 पर्यंत देशात डुप्लिकेट, अपात्र आणि बनावट 2 कोटी 41 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान यूपीमध्येच सर्वाधिक म्हणजेच 1.42 कोटी रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *