शिंदे- फडणवीस सरकार कोसळणारच, कारण….एकनाथ खडसे यांनी केले स्पष्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ ऑक्टोबर । राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार केव्हा कोसळेल हे सांगता येणार नाही. सध्यातरी सर्व अधांतरी आहे. अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते यावर सर्व अवलंबून आहे. सरकारची निश्चिचता, अनिश्चितता न्यायालयाच्या निर्णयावर आहे. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आमदारांमध्ये असंतोष पसरला तर सरकारला त्यावेळीही धोका पोहचू शकतो. प्रत्येकाला अपेक्षा आहे त्यामुळे प्रत्येकाला संधी देणे अवघड आहे. त्यामुळे सरकार कोसळण्यासाठी बरीच कारणे आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे म्हणाले की, सरकार ज्यावेळेस बहुमतात असते तेव्हा निर्णय घेतले जातात ते वैध असतात. परंतु काही संकेत, नियम आपण पाळायचे असतात. अलीकडे सरकारमध्ये येणारे संकेत पायदळी ठेऊनच निर्णय घेतात, असे चित्र आहे. जे सरकार बहुमतात असते त्याचे निर्णय हे कायद्याने मान्यच असतात. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवार उभा केला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *