सरकारमधून बाहेर पडावे असे कार्यकर्त्यांचे मत, फडणवीसांसोबत बैठक झाल्यानंतर निर्णय घेऊ ; आमदार बच्चू कडू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ ऑक्टोबर । अपक्ष आमदारांचाही मला पाठिंबा आहे. सरकारमधून बाहेर पडावे असे कार्यकर्त्यांचे मत आहे. “आपला गेम होईल’ अशा पद्धतीचे संदेश कार्यकर्ते पाठवत आहेत. सोमवारी रात्री उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर बैठक आहे. या बैठकीत काय ठरते, त्यानंतर निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांचे मन दुखावले आहे. कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री व प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांना दिली.

सागर बंगल्यावरील बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे माहीत नाही. या चर्चेत काय ठरते त्यानंतर आम्ही अमरावतीत उद्या मंगळवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीत समाधानकारक निर्णय झाला तर नक्कीच कुठेतरी या वादावर पडदा पडू शकतो, असे संकेत कडू यांनी दिले. आमदारांनी पैसे घेतले नाही, असे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सत्तेतील घरातील माणूस जेव्हा आरोप करतो तर नाराजीचा सूर असणारच आहे असे कडू यांनी सांगितले. गिरीश महाजन यांच्याशी बोलणे झाल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *