बाबा रामदेव आणि ब्रिजभूषण सिंह यांच्यातील वाद पेटला, पतंजलीने पाठवली नोटीस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ डिसेंबर । गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह विरुद्ध बाबा रामदेव आणि पतंजली यांच्यात वाद सुरूच आहे. मात्र आता हा वाद थांबण्याचे नाव घेत नाही. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी पतंजलीच्या उत्पादनांवर प्रश्न उपस्थित केला होता. आता पतंजलीने पुन्हा एकदा ब्रिजभूषण यांना नोटीस बजावली आहे.

कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना गेल्या महिन्यात नोटीस मिळाल्यानंतर ते आक्रमक झाले होते. माझ्यात आणि बाबा रामदेव यांच्यात कोणतेही भांडण नसल्याचे ते म्हणाले होते. महर्षी पतंजली यांच्या नावाचा गैरवापर होत असून मी शेतकऱ्यांच्या हितासाठी उभा आहे. माझी पतंजलीसोबत कोणतीही वैयक्तिक स्पर्धा नाही. मला तुरुंगात जावं लागलं तरी आयुष्यभर तुरुंगात राहायला मी तयार आहे. मी जामीन घेणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर आता त्यांना पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे.

ब्रिजभूषण यांच्या या वक्तव्यावर पतंजलीकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. महर्षी पतंजली यांच्या नावाचा गैरवापर आणि बाबा रामदेव यांचे बनावट तूप हे प्रकरण आपोआप बाहेर आल्याचे ब्रिजभूषण सिंह म्हणाले होते. ज्या महर्षींच्या नावाने बाबा रामदेव कोट्यवधींचा व्यवसाय करत आहेत, मसाल्यापासून ते अंडरवेअर आणि बनियानपर्यंत सर्व काही विकत आहेत, त्यांनी या ठिकाणच्या विकासासाठी एक पैसाही खर्च केला नाही, असे ते म्हणाले होते. ज्या महर्षी पतंजलीच्या नावावर कोट्यवधींचा व्यापार होत आहे, त्या महर्षी पतंजलींचे जन्मस्थान दुर्लक्षित असल्याचे मला जगाला सांगायचे आहे, असे खासदार म्हणाले.

गोंडाच्या भूमीवर जन्मलेल्या व योगाचे प्रणेते महर्षी पतंजली यांचे नाव वापरण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल ब्रिजभूषण यांनी केला होता. महर्षी पतंजली यांच्या नावाचा वापर थांबवा व स्वतःच्या नावाने व्यवसाय करा असे ते म्हणाले. बाबा रामदेव यांनी महर्षी पतंजली यांच्या नावाचा वापर थांबवला नाही तर या मुद्द्यावर देशव्यापी आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले की, माझा देशाच्या न्यायालयावर विश्वास आहे, माझा संविधानावर विश्वास आहे, त्यामुळे बाबा रामदेव किंवा त्यांच्या अनुयायांनी जगाला धमकावावे पण मला धमकावू नये, असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले होते. देशाच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी मी काहीही करू शकतो. मी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलो आहे. गोंडा, बलरामपूर आणि कैसरगंजचे येथील लोकांनी मला घडवत आहेत. रामदेवांच्या कृपेने मी खासदार आणि आमदार होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *