TMKOC: ‘तारक मेहता..’ होणार बंद? रिटा रिपोर्टर म्हणाली “शोचा टीआरपी…”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ जानेवारी । तारक मेहता का उल्टा चष्मा हा लोकप्रिय शो आहे. जवळपास 14 वर्षांपासून सुरू असलेल्या या सिटकॉमचा टीआरपी नेहमीच उच्च राहिला आहे. पण काही काळापासून अनेकांनी शोमधून एक्झिट घेतली आहे. अलीकडेच तारक मेहता मालिकेचे दिग्दर्शन करणाऱ्या मालव राजदानेही निरोप घेतला आहे. यामुळे शोच्या टीआरपीमध्ये मोठे नुकसान होऊ शकते, असे मानले जात आहे. पण यामुळे शोचा एक भाग असलेली रीटा रिपोर्टर म्हणजेच प्रिया आहुजा हिने या विषयावर असहमती दर्शवली.

प्रिया ही दिग्दर्शक मालव राजदा यांची पत्नी आहे, तिनेही खूप आधी शोमधून एक्झिट घेतली आहे. तारक मेहतापासून मालव राजदा यांच्या आधी शैलेश लोढा, दिशा वाकानी, भव्य गांधी, राज अनाडकट हे कलाकार शो सोडून गेले आहे. पण तारक मेहता का उल्टा चष्मा चाहत्यांच्या पसंतीच्या यादीत राहिला. शोमधून या प्रसिद्ध कलाकारांचे जाणे निर्मात्यांसाठी चिंतेचा विषय असतानाच आता या शोचा टीआरपी पूर्वीसारखा राहणार नाही, असे चाहत्यांनाही वाटत आहे.

शोच्या घसरत्या टीआरपीवर मालवची पत्नी अभिनेत्री प्रिया म्हणाली की, “शोच्या गुणवत्तेत कोणतीही घसरण झालेली नाही. त्यापेक्षा बघणाऱ्यांच्या दृष्टीकोनातील फरकामुळे हे सर्व घडले आहे. दिलेल्या मुलाखतीत प्रिया म्हणाली होती की- “TRP चा हा नंबर गेम मला कधीच समजला नाही. पण तारक मेहता… ही मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे यावर माझा विश्वास नाही.”

प्रिया म्हणाली- “TRP सतत वर-खाली होत राहतो, कारण आजकाल लोक टीव्ही सीरियल्सशिवाय अनेक गोष्टी पाहतात. आजकाल, टीव्हीवर ठराविक वेळेत शो पाहण्याऐवजी लोक अॅप्सवर जाऊन त्यांच्या सोयीनुसार ते पाहणे पसंत करतात. प्रत्येकाला आपापल्या कामातून फ्री होऊन आपल्या इच्छेनुसार शो किंवा चित्रपट पाहणे आवडते.”

दिशा वाकाणीच्या रिप्लेसमेंटवर प्रिया म्हणाली, “हे खरे आहे की काही पात्रे अशी असतात की ती प्रेक्षकांवर वेगळी छाप सोडतात. लोक त्या व्यक्तिरेखेसाठी एकनिष्ठ होतात, पण मला वाटतं की लोक त्या पात्रापेक्षा शोला जास्त समर्पित आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *