महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ जानेवारी । औरंगाबादेत थंडीचा विक्रम पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये 55 वर्षात प्रथमच पारा 5.7 अंशावर गेला आहे. अर्धा महाराष्ट्र कडाक्याच्या थंडीने गारठला आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये थंडीची प्रचंड लाट आहे. आणखी दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. काश्मीरातील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेल्या दोन्ही पश्चिम चक्रवाताचे हे परिणाम आहेत. तेरा रेल्वे आणि काही विमानांना धुक्यामुळे प्रवासात विलंब होतोय.