कर्जबाजरी विजय मल्ल्याची ‘घरवापसी’ निश्चित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – भारताकडे प्रत्यार्पणाला आव्हान देणारे अपील ब्रिटनमधील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे कर्जबुडव्या उद्योजक विजय मल्ल्याची ‘घरवापसी’ निश्चित झाली आहे. येत्या २८ दिवसांत ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

स्टेट बँकेसह इतर बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून मल्ल्या ब्रिटनला पळून गेला. त्याच्या सर्व मालमत्ता गोठविण्यात आल्या आहेत. त्याचे प्रत्यार्पण करण्याचा आदेश वेस्ट मिन्स्टर येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी पूर्वीच दिला होता. मल्ल्याने या निकालाविरोधात तेथील उच्च न्यायालयात केलेले अपील २० एप्रिलला फेटाळण्यात आले. त्याने सर्वोच्च न्यायालयात केलेले अपीलही गुरुवारी फेटाळण्यात आल्यामुळे मल्ल्यासाठी न्यायालयीन लढ्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.

तोंडी युक्तिवाद, लेखी प्रश्नांवरील आदेश आणि फेरअपील अशा तिन्ही मुद्द्यांवर मल्ल्याचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याचे ब्रिटिश क्राइन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढे काय होणार? – प्रत्यार्पणाच्या आदेशावर ब्रिटनच्या गृहमंत्र्यांची स्वाक्षरी लागते.

यापूर्वी वेस्ट मिन्स्टर न्यायालयाने काढलेल्या आदेशावर ही स्वाक्षरी झाली होती. मात्र, त्या आदेशाविरोधात अपील झाल्याने सर्व प्रक्रिया नव्याने पार पाडावी लागेल. आता आदेशावर गृहमंत्र्यांची स्वाक्षरी नव्याने घ्यावी लागेल. ही सर्व प्रक्रिया २८ दिवसांत सुरू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *