![]()
महाराष्ट्र 24 : दि. 16 जानेवारी:
प्रतिनिधी अजय विघे
कोपरगाव व्यक्तिगत विकासासाठी शालेय अभ्यासाबरोबरच क्रीडा स्पर्धांतूनही विविध संधी उपलब्ध असतात, विद्यार्थी जीवनात या संधीचे सोने करून विद्यार्थ्यांनी आपला व्यक्तिगत विकास साध्य करावा असे प्रतिपादन आरपीआयचे राज्यसचिव दिपक गायकवाड यांनी केले. जेऊर कुंभारी येथील युवक रवींद्र बाबुराव पवार यांचा नगर येथे झालेल्या राज्यस्तरीय थालीफेक स्पर्धेत एकवीस वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक आल्याबद्दल आर पी आय शाखा जेऊर कुंभारी व भीम साम्राज्य सेना मित्र मंडळ यांचे वतीने आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की रवींद्र पवार या युवकाने प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने हे यश संपादित केले आहे ही जेऊर कुंभारी गावासाठी अभिमानाची बाब आहे. यापुढेही त्याने आपला सराव नियमित ठेवून राष्ट्रीय पातळीवर यश मिळवावे यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. तर नाशिक सी एन पी येथे सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असलेले प्रमोद काकडे यांनी पोलिस भरतीसाठी क्रीडा स्पर्धा व त्यांचे सन्मानपत्र कसे महत्वाचे ठरते याविषयी मार्गदर्शन केले. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन युवकांना प्रोत्साहन देणारे भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना रवींद्र पवार याने या यशामध्ये आई वडिलांचा, महाविद्यालयाचा तसेच शिक्षकांचा मोठा सहभाग असून सर्वांचे आभार मानले.
यावेळी संजय भालेराव, ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गायकवाड, बाबुराव पवार, संजय आव्हाड, भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे उपाध्यक्ष दावीद धिवर, कार्यध्यक्ष सुमित पगारे, नाना गवई, सोपान चव्हाण, बाबासाहेब बारसे, धीरेन गायकवाड, किशोर काकडे, रवि गायकवाड, किशोर खरात, सचिन गायकवाड, सुरज चव्हाण, भारत गायकवाड, अमोल काकडे, अवि पगारे, सुमित आव्हाड, सौ. अरुणा पवार, कांताबाई कोळे आदींसह आर पी आय व भीमसम्राज्य सेना मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप गायकवाड यांनी केले. तर भारत गायकवाड यांनी आभाप्रदर्शन केले.