त्यामुळे मी ……… , गुलाबराव पाटलांनी मनातलं बोलून दाखवलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मार्च । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर मागच्या 9 महिन्यात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार टीका होताना दिसून येत आहे. दरम्यान वादग्रस्त वक्तव्याने प्रसिद्ध असणारे गुलाबराव पाटील यांनी पुन्हा ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. मागच्या अडिच वर्षात उद्धव ठाकरेंमुळे विकास झाला नसल्याचे खापर गुलाबराव पाटील यांनी फोडले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये जलद गतीने कामे करू शकलो नाही. मात्र आता मूळ कामे सुरू झाली असून स्वातंत्र्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री सात महिन्यात पाच वेळा जळगाव जिल्ह्यात येणारी एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात सगळेच लॉकडाऊन व स्वतः उद्धव ठाकरे लॉकडाऊन होते. अशी टीका मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

कामाला उत्तर द्या व कामानेच बोला शेतकऱ्यांना व जनतेला काम हवय बोलबच्चन अमिताभ बच्चन नको त्यामुळे खोके बोलून विकास होत नाही. तर खोक्यांचा विकास झाला पाहिजे, खोके देऊन लोकांची काम केल्या गेली पाहिजे. ते काम मी करत असल्याचे म्हणत विरोधकांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आपल्यातला एक मराठा चेहरा आपल्यापासून लांब जात आहे. तो जाता कामा नये हे उद्धव ठाकरेंना समजावलं होतं. उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना त्यांना हात पाय जोडून विनंती केली होती. नागपूरपासून तर दादरपर्यंत सर्व गेले त्यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदार संघात विकास करू शकलो नसतो.

आपल्यातला एक मराठा चेहरा आपल्यापासून लांब जात असून तो जाता कामा नये हे उद्धव ठाकरेंना आधी समजावलं होतं. तसेच उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना हातपाय जोडून त्यांना विनंती देखील केली होती. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने नागपूरपासून दादरपर्यंत सर्व गेले त्यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदार संघाचा विकास करू शकलो नसतो. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना सोडून गेलो असा पुनरुच्चार पुन्हा एकदा मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगाव मधील एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *