महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मार्च । गुढी पाडवा आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने राज्यातील शिधाधारक कुटुंबांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला . मात्र कर्मचारी संपामुळे हा शिधा अद्याप शासकीय गोदामांमध्येच पडून राहिला…दरम्यान संप तर आता मिटला मात्र त्यामुळे आता गुढीपाडव्यानंतरच आनंदाचा शिधा गोरगरिबांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.