महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ एप्रिल । आदित्य ठाकरेंनी जे सांगितलं ते सत्य आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर येऊन ‘मला तुरुंगात जायचं नाही, मला अटकेची भीती वाटते’ सांगितलं होतं. त्यांनी अशाप्रकारची चर्चा याच माझ्या मैत्री बंगल्यावर येऊन माझ्याशीही केली होती. तेव्हा आम्ही त्यांना वारंवार समजावत होतो की, आपण प्रसंगाला सामोरं जावं. आपण लढणारे लोक आहोत, आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारस आहोत. मी त्यांना सांगितलं की, माझ्यावरही असा प्रसंग येईल, मला अटक करतील अशी भीती आहे. मात्र, मी अटकेच्या तयारीत आहे.