महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – उदगीर ता.(जीवन भोसले ) कोरोना संसर्गामुळे म्रत्यू होण्याचा धोका जास्त असलेल्या जेष्ठ नागरिकांचे काम अंतिम टप्यात आले आहे. सर्वे पुर्ण होताच त्यांच्यावर लक्ष ठेऊन दक्षती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येनार असल्याची माहीती उपजिल्हाधिकारी प्रविन मेंगशेट्टी यांनी दिली.
गेल्या काही दिवासापूर्वी विभागीय आयूक्त सुनिल केंद्रेकर यांच्या उपस्थीतीत पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत 55 वर्षावरिल नागरिकांचे सर्वेक्षन करुन त्यांची तपासनी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.त्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना संसर्ग होण्यासंदर्भात दक्षता घेण्याचे ऩियोजन करण्याचे आदेशित केले होते.
या विभागीय आयूक्तांच्या निर्देशानंतर उदगीर तालूक्यातील 87 ग्रांमपंचायत अंतर्गत असलेल्या 98गावे व सहा वाडी तांड्याचे नियोजन गटविकास अधिकारी अंकूश चव्हाण यांनी केले आहे.ग्रामिण भागात अंगणवाडी निहाय अंगणवाडी शिक्षिका आशा कार्यकर्ती व आरोग्य विभागाचा कर्मचारी यांच्याकडे हि जबाबदारी सोपवून त्यांच्यावर ग्रामसेवक व तलाठी यांचे नियंत्रन ठेवन्यात आले आहे.
उदगीर शहरामधे रेडझोन मधिल नागरीकांची सर्वे व तपासणी झाली आहे त्यामुळे जवळपास 40टक्के काम या पुर्वीच झाले आहे. उर्वरित सर्व सहरामधे एकुन नऊ टिम तयार करुन काम करण्यात येत आहे .
यामधे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या आरोग्यसेविका , अशा स्वयसेविका,व नगरपालिकेचे वसुलि निरीक्षक या तिघावर हि जबाबदारी सोपविण्यात आली आहे, याचें ही जवळपास 90टक्के सर्वेक्षण तपासणीचे काम पुर्ण झाले असल्याचि माहीती नगरपालीकेचे मुख्यधिकारी भरत राठोड यांनी दिली विभागीय आयूक्त व राज्यमंत्री यांनी निर्देशित केल्या प्रमाने 55 वर्षाच्या पुढील प्रत्येकाची माहीती विहित नमुन्यात भरून घेण्यात येत आहे. इतर आजार असणाऱ्या रुग्नांना दररोज ठेवन्यासाठीचे नियोजन , वेळोवेळी त्यांची करावी लागनारी तपासणी आदिसाठी सर्वेक्षणाचे काम पुर्ण होताच नियोजन करण्यात येनार आहे असे श्री. मेंगशेट्टी यानी सांगीतले.